सद्गुरु नागेशांनी दृष्टांत देऊन कान्होराजास जंगलात जाऊन साधना करावी अशी आज्ञा केली.
त्यानुसार ते केंदूर गावाजवळील पिंपळखोरे येथील जंगलात ओढ्याकाठी एका शिळेवर बसुन तपःश्चर्या करत
त्यातुन त्यांना अनेक सिध्दि प्राप्त झाल्या. मग पुढे ते गुरुग्रही वेदांत अध्ययनासाठी गेले व तेथील
अध्ययन फार थोड्या अवधीत कुशाग्र बुध्दी व एकपाठी असल्याने पुर्ण केले.
पुढे आई – वडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला. अतिशय सुशील व गुणवान असणार्या सुनेमुळे सासु – सासरे सुखावले.
कान्होराजांचा संसार सुरळीत चालु झाला पण जन्मतःच विरक्त असणारे कान्होराज संसारत कसे रमणार?
पुनः पिंपळखोरीत जाऊन साधना सुरु झाली व उरलेल्या वेळात समाजात धर्माचरण व शास्त्रमार्गाबद्दल
उपदेश प्रचार करत असत. अशा रितीने 10 – 12 वर्षांचा काळ गेल्यावर आईवडिल व आप्तजनांच्या
आग्रहामुळे त्यांना दुसर्या विवाहास सामोरे जावे लागले. दोन्ही पत्नी एकत्र अतिशय आनंदाने रहात होत्या
त्यामुळे त्यांचा प्रपंच अतिशय सुखात चालला.
कालांतराने माता – पित्याचे छत्र हरपले.
सद्गुरु कृपेने संसारात राहुन शुध्द शास्त्राप्रमाणे आचरण ठेऊन समाजापुढे आर्दश ठेविला.
पाठी मागे...
पहिले पान