ते प्रयाण सिध्दीव्दारे रोज पहाटे काशीस गंगा स्नानास जात व काशी विश्वेश्वराच्या दर्शनानंतर
कुलस्वामिनी रेणुकामातेच्या दर्शनास माहुरगडला जात व मग केंदुरला परत येत.
एकदा माहुर मध्ये समाधी अवस्थेमध्ये रेणुका मातेशी सुसंवाद साधत बराच वेळ झाला व
त्यामुळे केंदूर येथे त्यांचा परिवार खुप काळजीत पडला, काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी याचा उपयोग
करुन काबन्होराजांच्या घरी येवून कान्होराजांनी देवीसमोर देह ठेवला असे खोटे सांगितले.
त्यामुळे कान्होराजांच्या दोन्ही पत्नी सती गेल्या. हे कान्होराजांना ते केंदूरला आल्यावर समजले
तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींना अग्निनारायणाला अवाहन करुन पूनर्जिवीत केले,
व त्या विघ्नसंतोषी व्यक्तींना माफ करुन सन्मार्गाला लावले.
पाठी मागे...
पहिले पान